Vidhan Parishad: Jayant Patil यांच्या पराभवाचे मास्टरमाइंड Eknath Shinde ? नेमकी रणनीती कशी आखली ?
#BolBhidu #VidhanParishad #Eknathshinde
विधानपरिषदेचा निकाल लागला आणि 12 व्या उमेदवाराचा अर्थात शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला. ठाकरे गटाने नार्वेकरांना मैदानात उतरवलं आणि निवडणूक लागली. जर ठाकरेंनी नार्वेकरांना मैदानात उतरवलच नसतं तर जयंत पाटील बिनविरोध निवडून गेले असते. पण अजित पवारांचा उमेदवार पाडण्यासाठी शरद पवारांनी आखलेली रणनिती म्हणूनच या खेळीकडे पाहिलं जात होतं. नार्वेकरांसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले आमदार मदत करतील व या प्रयत्नात शिंदेंच्या सेनेकडून क्रॉस वोटिंग होईल. असा प्रयत्न झाल्यास अजित पवारांना लागणारी मतं कमी पडतील व अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव होईल. पण झालं उलटच.
नार्वेकर देखील आले आणि महायुतीचे सर्व उमेदवार देखील निवडून आले. पराभव झाला तो जयंत पाटलांचा. आत्ता ही पराभवाची स्क्रिप्ट कशी लिहण्यात आली. डावपेच कसे आखले गेले, एकनाथ शिंदे या रणनितीचे मास्टरमाईण्ड कसे ठरले समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Пікірлер: 864
खूप दुर्दैवी गोष्ट अखेर पवारांनी शेकापचा अखेरचा श्वास घेतला.शेकाप संपुष्टात आणला 😢
ज्या दिवशी बारामती पर्वाचा अंत होईल त्याच वेळी हा महाराष्ट्र सुधारेल आणी महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदानी राहतील
मुलींचे उच्च शिक्षण मोफत केल्या बद्दल शिंदे जी , अजित जि व देवेंद्र जि यांना विनम्र पूर्वक खुप खूप धन्यवाद.
६० वर्षात झाली नाही असीकामे होत आहे अनेक योजना राबवित आहे.कोनीही दिल्या नसतील इतक्या सवलती सरकार देत आहे.खरोखर लोकांचे सरकार.पण जरांगे अजून गप्प कसा बसला काही कळेना.
Eknath Shinde किंगमेकर💯
40 वर्षाच्या राजकारणाचा हळू हळू अंत होत आहे. नियती चा खेळ 😅😊
नार्वेकरांच्या विजयाचे मास्टरमाइंड म्हणायला हवे ना…खरं तर ! शिंदेंना नार्वेकर जास्त जवळचे असणार !!
उद्धव ठाकरे ने नार्वेकर ला पाडायला उभा केला होता शिंदे साहेब यांनी नार्वेकर ला निवडून आणला शिंदे साहेब नवीन बॉस
देवेंद्र ,एकनाथ अजित या त्रिकुटाने विजय मिळवलाय तुम्ही उगाच काड्या घालू नका हो शरद पवरांसारख्या 😊😊
शरद पवाराना उध्दव ठाकरेना संपावयाचे आहे.पण होतेय उलटे.
Mastermind तर देवा भाऊ आहेत... गेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये विरोधी बाकावर असताना सुद्धा महा भकास आघाडी ला धोबी पछाड दिला होता..नाद करा पण देवाभाऊ चा कुठं 🌷✌️💪
शिंदेंनी भले भले लोळवले गेले 2वर्ष झाले तेच दिसतय🔥विरोधकांना सतरंज्या उचलयच्याय म्हणून पटणार नाही😂
चिन्मय भाऊ, जातीपातीचे आणि सामाजिक समीकरण जर जुळले नाही तर महाविकास आघाडी जिंकू शकत नाही. सामाजिक फूट आणि महायुती समर्थकांचे मतदानाला न जाणे हेच महायुतीच्या लोकसभेतील पराभवाचे कारण आहे. प्रत्येक लोकसभा मतदार संघातील वॉर्ड निहाय मतदान पाहिले की जाणवेल नक्की काय कारण आहे ते.
हे मतदान कसं आसत,
एकनाथ शिंदे नी नार्वेकर ना मदत केली
आज इथे जरांगे ची बढाई मारणारा कोणी दिसत नाहीये !!
खरे मास्टरमाईंड हे फक्त देवेंद्र साहेब आहेत..
मला असं वाटं आहे की मुंबई पदवीधर निवडणुकीत अनिल परब साहेब निवडून आले तेना सुधा एकनाथ शिंदे यांनी निवधून आणल आहे हेच आता बोल भिडू मधून आईकायच बक्की आहे
देवा भाऊ ची जादु चालु झाली कि विरोधकांच्या डांगीतुन आग निघते...बोलभीडु च वेगळ काय होणार...लहान आहात तुम्हि खरा गेम मांडला तो देवा भाऊ ने
भाऊ जर जयंत पाटील साहेबांनी रायगड मध्ये गीते साहेबच काम केलं अस्त तर अलिबाग मधून तटकरे साहेबांना एवढी मोठी लीड भेटली नसती शेतकरी कामगार पक्षाने रायगड मध्ये आणि माळवा मदत केलेली दिसत नाही त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली असेल?